-10.2 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्रात कृषी धोरणात नवा अध्याय: राज्यपालांच्या नेतृत्वाखाली ‘नैसर्गिक शेती मिशन’ सुरू

महाराष्ट्रात कृषी धोरणात नवा अध्याय: राज्यपालांच्या नेतृत्वाखाली ‘नैसर्गिक शेती मिशन’ सुरू

राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट :मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक बदल घडवण्यासाठी मुंबईतील राजभवन येथे नुकतेच ‘प्राकृतिक कृषी संमेलन २०२५’ आयोजित करण्यात आले. या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नेतृत्वाखाली ‘नैसर्गिक शेती मिशन’ (Natural Farming Mission) सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे राज्याच्या कृषी धोरणात नवा अध्याय जोडला गेला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, रासायनिक खते आणि संकरित बियाणांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता घटली असून, नैसर्गिक शेती हाच हवामान बदलावरचा प्रभावी उपाय आहे. या मिशनद्वारे सन २०२५ पर्यंत राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

यावेळी फडणवीस यांनी गो-धनाचे महत्त्व अधोरेखित केले. देशी गायीचे शेण व गोमूत्र वापरून तयार होणाऱ्या ‘जीवामृता’मुळे शेतीचा पोत सुधारतो, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादकता वाढते. गो-धन टिकवणे म्हणजे शेतीचा जीव टिकवणे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीतील फरक स्पष्ट करत, मंत्री आणि आमदारांना ‘मिशन मोड’मध्ये नैसर्गिक शेतीचा प्रचार करण्याचे आवाहन केले. शासनाच्या या मिशनमुळे महाराष्ट्र लवकरच देशातील नैसर्गिक शेतीचे पुढचे केंद्र (Hub) बनेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles